मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान झाले आहे.
एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
वर्धा - १८.३५ टक्के
अकोला -१७.३७ टक्के
अमरावती - १७.७३टक्के
बुलढाणा - १७.९२ टक्के
हिंगोली - १८.१९ टक्के
नांदेड - २०.८५ टक्के
परभणी -२१.७७ टक्के
यवतमाळ - वाशिम -१८.०१ टक्के