उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांचे प्रतिपादन
हरळी येथे महागाव मंडल अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी): जनतेने शासकीय कार्यालयात येण्याऐवजी शासनच आपल्या दारी आले आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहन करतानाच शासनाच्या सर्व प्रशासकीय सेवा वेळेत व उत्तम देण्याचा प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी केले. या शिबिरात विविध १४१७ दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
हरळी (ता. गडहिंग्लज) येथील सिंबायोसिस स्कूलमध्ये महागाव मंडल अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रसंगी तहसीलदार ऋषिकेत शेळके, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, भारती जाधव, भूमी अभिलेख उपविभागीय अधिकारी श्री. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी गीता कोरे, तालुका कृषी अधिकारी लिगाडे, आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी घरकुल योजनेची माहिती दिली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकरी गीता कोरे, तालुका कृषी अधिकारी लिगाडे, पंचायत समिती कृषी अधिकारी जजान्नावर, भारती जाधव, महावितरणचे नागेश बसरीकट्टी, भूमी अभिलेखचे उपविभागीय अधिकारी पाटील, आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे, विस्तार अधिकारी सौ. देशपांडे यांनी आपल्या विभागातील विविध योजनांची माहिती दिली. यावेळी आयोजित आरोग्य शिबिरात नागरिकांची तपासणी देखील करण्यात आली. या शिबिरात आधार नोंदणी, ॲग्री स्टॅग नोंदणी देखील करून घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष तेली, सहाय्यक गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे, निवासी नायब तहसीलदार विष्णू बुट्टे, मंडल अधिकारी आर. के. तोळे, महागावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न चौगुले, महागावचे सरपंच प्रशांत शिंदे, हरळी बुद्रुकच्या सरपंच निलम कांबळे, हरळी खुर्दच्या सरपंच साधना आयवळे, हसुरवाडीच्या सरपंच कोमल भोसमोडे, मासेवाडीच्या सरपंच रोहिणी रेडेकर, उंबरवाडीच्या सरपंच कविता सुतार,हिडदुगीचे सरपंच संतोष कांबळे, हसुरसासगिरीचे सरपंच प्रदीप कडुकर, औरनाळचे सरपंच संदीप पाटील, कविता कागिनकर, सुभाष चोथे यांच्यासह महागाव मंडळ अंतर्गत गावातील सर्व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी, वीज कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका मदतनीस, आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अतुल अहिरे यांनी तर आभार निवासी नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांनी मानले.