गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर आज पहाटे पाच वाजता पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गडहिंग्लज - चंदगड राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. काल या नदीवरील ऐनापुर, निलजी हे दोन बंधारे पाण्याखाली गेले होते. आज पहाटे भडगाव पुलावर देखील पाणी आले.
प्रशासनाने दक्षता घेतली असून सुरक्षित वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन केले आहे. भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक हे या मार्गावरील वाहनधारकांना मार्गदर्शन करत आहेत.