बेळगाव येथील डॉ. प्रतिभा मुदलियार यांचे प्रतिपादन
गडहिंग्लज येथील डॉ.घाळी सभागृहात 'कदळीय कर्पूर' ग्रंथाचा प्रकाशन समारंभ
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शरणांच्या संघामुळे माझे मन शुद्ध झाले. शरणांच्या अनुभवामुळे माझे प्राण शुद्ध झाले. शरणांच्या प्रसादाने माजी सर्वे शुद्ध झाली. असा प्रखर विश्वास बाळगलेल्या महादेवीला परमात्म्याशी एकरूप होता आले. आपल्या अध्यात्मिक कष्टाच्या जोरावर अक्कमहादेवी सर्वांची मार्गदर्शक झाली. म्हणूनच महादेवीला भक्ती क्षेत्रात उच्चकोटीतले स्थान प्राप्त झाले. असे विचार बेळगाव येथील डॉ. प्रतिभा मुदलियार यांनी व्यक्त केले.
गडहिंग्लज येथील विद्या प्रसारक मंडळ डॉ.घाळी सभागृहात आयोजित 'कदळीय कर्पूर' या मराठी अनुवादित व संस्कारित ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. डॉ. श्री जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी (निडसोशी), श्री नि.प्र. महांत सिद्धेश्वर महास्वामीजी, श्री ष.ब्. गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात लेखिका श्रीमती शालिनी दोडमनी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. दत्ता देशपांडे व प्रतिभा देशपांडे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे.
डॉ. मुदलियार यांनी आपल्या भाषणात अक्कमहादेवी यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेताना कन्नड साहित्यिक डॉ. तिप्पेरुद्रस्वामी या मूळ लेखकाने लिहिलेल्या रचनेचा आपल्या खुमासधार शैलीत वर्णन करीत अक्कमहादेवीचे चरित्र श्रोत्यांसमोर मांडले. कादंबरीतील संवाद, काव्यरचना, आणि प्रसंगाचे यथोचित वर्णन यावरून अक्कमहादेवीच्या व्यक्तिमत्त्वाची अगदी जवळून ओळख होते. यातील संवाद रचना अत्यंत गोड आहेत. पण बारा वर्षाच्या मुलीने अध्यात्माचे विचार व्यक्त करणे हे कल्पनेच्या पलीकडचे आहे. अक्कमहादेवीच्या परमेश्वराची ओढ, त्यासाठी केलेली साधना, अनेक संकटांना सामोरे जात उच्च कोटीतले अध्यात्म प्राप्त करणारी जगातील एकमेव महिला आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. श्री जगद्गुरु पंचलिंगेश्वर महास्वामीजी यांनीही आपल्या आशीर्वाचनात लेखिका दोडमनी, संपादक देशपांडे दाम्पत्य यांचा विशेष उल्लेख करून 'कदळीय कर्पूर' या कादंबरीवर परिसंवाद झाले पाहिजेत. अक्कमहादेवीचे विचार जास्तीत जास्त वाचकापर्यंत पोहोचले पाहिजेत. आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी, भयमुक्त जीवन साध्य होण्यासाठी अंतर्नादाची साथ आवश्यक आहे. असे स्पष्ट करून वाचन संस्कृती वाढीसाठी आपण मठाच्या वतीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात लेखिका दोडमनी यांनी या कादंबरीच्या निर्मिती विषयी माहिती दिली. प्रा. किसनराव कुराडे यांनीही विचार व्यक्त केले. डॉ. सतीश घाळी यांनी उपस्थितांचे स्वागत तर या कादंबरीचे संपादक दत्ता देशपांडे यांनी प्रास्ताविकात कादंबरी संस्करनाचा आढावा घेतला. रावसाहेब मुरगी यांनी आभार मानले.
सूत्रसंचालन प्रा तेजस्विनी गारगोटे व प्रा. अश्विनी पाटील यांनी केले. श्री जगद्गुरु दुंडेश्वर सिद्ध संस्थान मठ निडसोशी, व श्री जडयसिद्धेश्वर आश्रम बेलबाग यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला सौ. प्रतिभा देशपांडे, विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद कितुरकर, सचिव अँड.बी.जी. भोसकी,सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक अँड.विकासअण्णा पाटील, डॉ. शिवकुमार कोल्हापुरे,किशोर हंजी, महेश चाळी, राजेंद्र गड्यान्नावर, बाबासाहेब पाटील (खातेदार), रमेश रिंगणे,बसवराज आजरी,डॉ. सुरेश संकेश्वरी, राम पाटील, बाळासाहेब पाटील औरनाळकर, सौ.मीना कोल्हापुरे, विश्वनाथ हंजी, महाबळेश्वर चौगुले, जितेंद्र नाईक, प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, श्रीरंग तांबे, मनोहर गुलगुंजी, उमेश सावंत उपस्थित होते.