पालकमंत्री प्रकाश आबिटकर, अशोकआण्णा चराटी यांनी केले मार्गदर्शन
आजरा(हसन तकीलदार) : बालक मंदिर शाळेच्या उदघाट्न कार्यक्रमानंतर लगेचच आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील मतदार संघांचे तुकडे केल्याबद्दल आणि जिल्हापरिषद गण कमी केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी खंत आणि नाराजी व्यक्त केली. प्रत्येकाने आपले म्हणणे मांडले व त्यावेळी पालमंत्री आणि अशोकआण्णा चराटी यांनी आपले मत व्यक्त करीत आढावा घेतला.
यावेळी पालमंत्री आबिटकर म्हणाले, आजऱ्यातील तीन ऐवजी दोन जिल्हा परिषदेच्या जागा झाल्या. त्यामुळे माझ्याच मतदारसंघातील ४० गावांवर हा अन्याय होणार आहे. त्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेशी चर्चा करुन दुरुस्त केला जाईल असे आश्वासन दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी केलेल्या विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. आजरा तालुक्याच्या समृद्धीसाठी यापुढेही विकासकामे करणार आहे असेही आश्वासन ना.आबिटकर यांनी दिले अध्यक्षस्थानी आजरा बँकेचे व आण्णा भाऊ समूहाचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी होते.
आजरा शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी चित्रीवरून 27 कोटींची पाणी योजना नामदार आबिटकर यांनी मंजूर केली. तर २५ कोटींचे रस्ते व गटर्सना मंजुरी मिळाली आणि आता पाऊस सुरू झाला आहे. अधिकारी व कर्मचारी वेळेवर काम करत नाहीत.त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदरची कामे निवडणुकीपूर्वी पूर्ण करणार आहे असे अशोकअण्णा चराटी यांनी सांगितले.
मेळाव्यास विलास नाईक, विजयकुमार पाटील, ज्योत्स्ना चराटी, जनार्दन टोपले, दशरथ अमृते, जयवंत सुतार,संभाजी सरदेसाई, जी.एम. पाटील, संजय चव्हाण, असिफ पटेल, शरीफ खेडेकर, विजय थोरवत,अनिरुद्ध केसरकर, सी.आर. देसाई, मारुती मोरे, गोविंद गुरव यासह विविध गावातून आलेले सरपंच, सेवा संस्थाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.