गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील भाजपा कार्यालयामध्ये डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसा निमित्त माधव पोटे -पाटील यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपाचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष प्रीतम कापसे यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा माहिती दिली. ते म्हणाले, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म ६ जुलै, १९०१ रोजी तर मृत्यू २३ जून, १९५३ झाला. हे एक भारतीय राजकारणी, वकील आणि शिक्षणतज्ञ होते. ते भारतीय जनसंघाचे संस्थापक होते आणि हिंदुत्व विचारधारेचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० ला विरोध केला आणि त्यासाठी त्यांनी 'एक देश, दोन निशाण, दोन विधान, नकोच' अशी घोषणा दिली होती. भारताच्या एकता अखंडता साठी त्यांना बलिदान द्यावे लागले. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आपला देश अखंड राहिला पाहिजे. देशात एक विधान, एक निशाण राहिले पाहिजे. असा त्यांचा नारा होता. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म ६ जुलै १९०१ ला त्याकाळच्या अविभाजित बंगालमध्ये झाला होता. २३ जून १९५३ रोजी त्यांचे रहस्यमय परिस्थितीत निधन झाले.
यावेळी अनिल गायकवाड, अमित पाटील, मानसिंग जाधव, सुधाकर गोरुले, प्रताप मोहिते, प्रकाश संकपाळ, डॉ ऋषभ कासार, विक्रम कदम, संग्राम आसबे,श्री.नितेश कोरी, सतीश सभासद, महिला मोर्चाच्या भाजपा जिल्हाध्यक्षाअनिता चौगुले, सौ.अर्चना रिंगणे,सौ.ॲड परमेश्वरी पाटील, सौ.आनंदी चव्हाण, सौ. निलांबरी भुईंबर, सौ.भारती सावंत उपस्थित होते.