गडहिंग्लजला ठाकरे शिवसेनेने केले हिंदी सक्ती आदेशाची होळी
हिंदीला विरोध नाही, मात्र पहिलीपासून सक्ती हे चुकीचे धोरण : प्राचार्य कल्याणराव पुजारी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश जारी केला आहे. या विरोधात गडहिंग्लज येथे शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आंदोलन करत या सरकारी आदेशाची होळी केली. येथील दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मराठी भाषिकांविरोधात कटकारस्थान रचणाऱ्या सरकारचा जोरदार घोषणाबाजी करत यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, राज्यात व केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून वेगवेगळी धोरणे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य, आदेश व राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही दिवसांपूर्वी या सरकारने मराठी, इंग्रजी बरोबरच हिंदीची सक्ती करा असा आदेश काढला. पहिलीतील मुलांची बौद्धिक क्षमता पाहता त्यांच्या बुद्धीवर अनावश्यक ओझे टाकण्याचे काम हे सरकार करत आहे. या पाठीमागे हिंदी भाषिक राज्यांच्या प्रमाणे महाराष्ट्रात देखील धोरणे राबविण्याचा सरकारचा 'गुप्त अजेंडा' आहे. गुजरातमध्ये हिंदी सक्ती करू शकत नाही मग महाराष्ट्रातच हिंदी सक्ती का केली जाते? ही सक्ती करून महाराष्ट्रातील मराठी भाषिक व नागरिकांविरुद्ध हे सरकार कटकारस्थान करण्याचे काम करत आहे, मात्र हे कारस्थान तमाम महाराष्ट्रातील जनता हाणून पाडेल.
प्राचार्य कल्याणराव पुजारी म्हणाले, हिंदीला विरोधाचे कारण नाही, मात्र पहिलीपासून मुलांना हिंदी शिकवायचे हे सरकारचे चुकीचे धोरण आहे. या धोरणाला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा विरोध आहे. त्यामुळे सरकारने हिंदी सक्तीचा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी तालुकाप्रमुख दिलीपराव माने, युवराज पोवार यांचीही भाषणे झाली.
महिला जिल्हा संघटिका शांता जाधव, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, सुरेश चौगुले, युवा सेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, तालुकाप्रमुख दिलीप माने, युवराज पवार, जयसिंग टिकले, अजित खोत, बाबासाहेब पाटील, उत्तम पाटील, वसंत नाईक, सुरेश हेबाळे, समीर देसाई, प्रकाश रावळ, मनीष हावळ, कृष्णात कांबळे, सागर भावके, संकेत रावण, ओंकार माध्याळकर, विक्रम मुतकेकर, मधुरा कांबळे, श्रद्धा शिंत्रे, सूमन देसाई, मधुरा जैन, रेखा पाटील ,कृष्णा पाटील, सुयश पाटील, श्रीशैलाप्पा साखरे, कृष्णा कांबळे, शैलेश इंगवले, राजू रामजी, बाबू नाईक, बाळू कुंभार, मारुती वाघराळकर, आप्पा सुतार, अर्जुन पाटील, आप्पा सुतार, मल्लाप्पा चौगुले, संभाजी येडूरकर, बाळू कडुकर, शंकर गवळी, बाळू सुपले, विशाल चव्हाण, तेजस घेवडे, सुमित कोरवी, कमलेश गोरुले, संतोष कदम यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील कल्याणराव पुजारी, बचाराम काटे, साताप्पा कांबळे, प्रा. प्रकाश कट्टी, सुरेश दास व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.