चंदगड तालुक्यातील वि. मं.बेरडवाडा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
चंदगड : सत्यमेव सेवा फौंडेशन (महाराष्ट्र राज्य) मुंबई -गडहिंग्लज, कोल्हापूर मार्फत एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत मदतीचा हात दिला. हा उपक्रम अतिदुर्गम विभागातील वि. मं.बेरडवाडा शाळेत राबविण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय दप्तर (बॅग) व पाण्याची बॉटल, एक रेघी, दुरेघी, चाररेघी अशा अर्धा डझन वह्या, स्केचपेन पाकीट , ड्रॉईंग वही, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर, शार्पनर व इतर शालोपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबुराव वरपे यांनी करताना सत्यमेव सेवा फौंडेशनचे महाराष्ट्राच्या विविध भागांत चाललेले शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्रातील कार्य गोरगरीब समाजासाठी प्रेरणादायी व आदर्शवत असलेचे सांगितले. दीपप्रज्वलन फौंडेशनचे अध्यक्ष संदिप मेंगाणे, संस्थापक सुनिल बोरनाक, प्रदेश अध्यक्ष दिनकर खवरे, सचिव अविनाश लोंढे, महिला अध्यक्षा विद्या खामकर , कार्याध्यक्ष सतिश पाटील,खजिनदार रामचंद्र भोसले यांचे हस्ते झाले. फोटोपुजन प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशांत बोरनाक, जिल्हा संपर्क प्रमुख एच. एन. पाटील, जिल्हा प्रमुख तानाजी पावले, सरपंच किरण नाईक, शालेय कमिटी अध्यक्ष जयवंत नाईक, सामाजिक कार्यकर्ते विष्णू कांबळे, माजी सरपंच आप्पाजी नाईक व दाटे केंद्र मुख्याध्यापक विश्वनाथ गावडे , शालेय कमिटी उपाध्यक्षा मिनाक्षी नाईक यांचे हस्ते झाले.
यावेळी सत्यमेव सेवा फौंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार शाल,पुष्प देवून मुख्याध्यापक बाबुराव वरपे, शालेय कमिटी अध्यक्ष जयवंत नाईक , सरपंच किरण नाईक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सत्यमेव सेवा फौंडेशनच्या कार्याचा आढावा प्रदेश सरचिटणिस डॉ .सुशांत बोरनाक यांनी घेतांना दुर्गम, डोंगराळ भागातील गोरगरीबांची मुले शिक्षणातून मोठी झाली पाहिजेत, जीवनात घडली पाहिजेत हा सत्यमेव सेवा फौंडेशनच्या मदतीचा हेतू असल्याचे सांगितले. फौंडेशनचे अध्यक्ष संदीप मेंगाणे म्हणाले, आज चंदगड तालुक्यातील वि.मं.बेरडवाडा शाळेतील मुलांना मदतीचा हात देताना विशेष आनंद होत आहे. भविष्यात अशा मदतीतून जीवनात उभे राहीलेली मुले आपली शाळा, आपला समाज यांना कधीही विसरणार नाहीत असे सांगितले. जिल्हा प्रमुख तानाजी पावले गुरुजी व जिल्हा संपर्क प्रमुख एच.एन.पाटील सर यांनी पालकांना संबोधीत करताना आपली मुले ही मौल्यवान संपत्ती असून त्यांची उत्तम जडण-घडण करणेत पालकांनी प्रमुख भूमिका बजावावी असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल दाटे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच किरण नाईक, सामाजिक कार्यकर्ते विष्णू कांबळे, भटक्या-वंचित समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल बाबुराव वरपे, उत्कृष्ठ शैक्षणिक कार्याबद्दल दाटे केंद्र शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ गावडे यांचा विशेष सत्कार करणेत आला. फौंडेशनची विविध पदांवर नियुक्ती झाल्याबद्दल व पी.एच.डी.पदवी मिळवल्याबद्दल डॉ.सुशांत बोरनाक, तानाजी पावले,एच.एन.पाटील,विद्या खामकर यांनाही विशेष सन्मानित करण्यात आले.
सत्यमेव सेवा फौंडेशनने वि.मं.बेरडवाडा शाळेतील मुलांना भरीव शैक्षणिक साहित्य दिले बद्दल फौंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व शालेय मुलांना मदत मिळवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडल्याबद्दल मुख्याध्यापक बाबुराव वरपे यांचे विशेष आभार मानले. आभार शालेय कमिटी अध्यक्ष जयवंत नाईक यांनी मानले. यावेळी शालेय कमिटी सदस्य, पालक, ग्रामस्थ , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.