Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात नीती आयोगाच्या धर्तीवर 'राज्य परिवर्तन महाराष्ट्र संस्थान' स्थापन करावे!

भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यात देशस्तरावरील निती ( NITI-National Institute of Transforming India) आयोगाच्या धर्तीवर राज्य परिवर्तन महाराष्ट्र संस्थान (SITMA-State Institute of Transforming Maharashtra)  स्थापन करावे अशी मागणी भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठवलेल्या पत्रातून केली आहे.



या पत्रात म्हटले आहे की, देशात 2014 साली पहिल्यांदाच आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारने सत्तेवर येताच आमुलाग्र परिवर्तनाला प्रारंभ केला. फक्त आगामी 5 वर्षांच्या योजनांचा विचार करणारा नियोजन आयोग (Planning Commission) बरखास्त करून त्या ऐवजी पुढच्या दिर्घकालीन 25 वर्षांच्या राष्ट्रीय नियोजनांचा संकल्प करणाऱ्या निती ( National Institute of Transforming India) आयोगाची स्थापना करण्यात आली.गेल्या 10 वर्षांतील कृषी, उर्जा, आरोग्य,शिक्षण, उद्योग, पर्यावरण ह्या क्षेत्रातील निती आयोगाचे काम आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे चालू आहे.त्यामुळे देशाचा सर्वच क्षेत्रात द्रूतगतीने विकास होत आहे. 2027 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर करावयाची आहे.त्यात महाराष्ट्राचा वाटा 1 ट्रिलियन डॉलरचा असणार आहे‌.त्यासाठी राज्यातील शेती, शिक्षण , आरोग्य, उद्योग इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन आवश्यक असून, त्यासाठी महाराष्ट्र राज्यात देशस्तरावरील निती ( NITI-National Institute of Transforming India) आयोगाच्या धर्तीवर SITMA-State Institute of Transforming Maharashtra) आयोगाची स्थापना करावी अशी मागणी श्री. सावंत यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.