Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या देव, धर्म आणि देशासाठी प्राणपणाने लढल्या : डॉ.यु.जी.इंगवले



गडहिंग्लज (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांचे इंदौर संस्थानाचे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर न डगमगता मराठा साम्राज्याच्या संरक्षणासाठी आणि विस्तारासाठी रणरागिणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्राणपणाने लढल्या. त्या स्रीशक्ती सशक्तीकरणाच्या खऱ्या प्रेरक आहेत. त्यांच्याकडे महिला सैनिकांची स्वतःची फौज होती. त्या स्वतः फौजेचे नेतृत्व करत होत्या. मुघलांनी पाडलेली सोमनाथ मंदिर, काशी, हरिद्वार आणि त्र्यंबकेश्वर  येथील अनेक मंदिरे आणि नदीघाट पुन्हा उभारले. राज्याच्या औद्योगिक आणि कृषी विकासासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.त्या आजच्या पिढीलाही आदर्श आहेत, असे उद्गार गडहिंग्लज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.यु.जी.इंगवले यानी काढले.



भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अभियंता आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा संघटनेने आयोजित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रीशताब्दी जयंतीच्या प्रभावी व्यक्तिमत्त्व कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र मांडेकर, माजी उपनगराध्यक्ष व श्री महालक्ष्मी आणि श्री संत बाळुमामा मंदिर सेवा संस्थानचे अध्यक्ष रमेश रिंगणे, श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, आर्किटेक्ट मयुर बडदारे, इंजिनिअर गिरिष सावंत, बॅंकिंग गोल्ड माॅर्गेज व्हॅल्यूअर आणि संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य आनंद पेडणेकर, अर्चना रिंगणे, निलांबरी भुईंबर, भारती सावंत, प्रकाश गवळी, जावेद मुल्ला, मुझंबील मुल्ला,अकबर मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत यानी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.